आमच्याविषयी
महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील रत्नागिरी पासून सुमारे ५० किलोमिटर व राजापुर पासुन २२ किलोमीटर देवीहसोळ हे गाव प्रसिध्द आहे ते म्हणजे इथल्या ग्रामदेवता श्री. आर्यादुर्गा देवी व श्री. जाकादेवी मंदिरासाठी. निसर्गाच्या सौंदर्याने नटलेल्या आणि अतिशय शांत अशा परिसरात वसलेल्या देवीहसोळ गावची ग्रामदेवता श्री.आर्यादुर्गा देवी मातेची आख्यायिका आणि इतिहास ही रोमांचक आहे. श्री.आर्यादुर्गा देवी व श्री. जाकादेवी मातेचे देवस्थान हे जागृत देवस्थान असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. त्याचप्रमाणे देवीहसोळ गावातील कातलशिल्प ही प्रसिद्ध असून कोकन पर्यटन विकास आराखड्यात देवीहसोळ गावाच्या कातलशिल्पचा समावेश केला असून ही कातळशिल्प 10 हजार वर्ष जुनी असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.